स्वभावदोष निर्मूलनासाठी बौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न

70 63

Also available in: Hindi

दिव्याभोवतीच्या काचेच्या वेष्टनावर धरलेली काजळी स्वच्छ केल्यावरच दिव्याचा लख्ख प्रकाश बाहेर पडू शकतो. तद्वतच आपल्याभोवती असलेली रज-तमात्मक दोषांच्या आवरणाची काजळी दूर केल्यावरच अंतरातील सच्चिदानंदमय ईश्‍वराची अनुभूती येऊ शकते. सच्चिदानंदावस्था प्राप्त होईपर्यंत प्रत्येकालाच स्वभावातील परिवर्तनाच्या या प्रक्रियेचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. त्यासाठी अंतर्मुख होण्याची प्रक्रिया ही दिवसातील एका विशिष्ट कालावधीपुरती मर्यादित न रहाता ती सततची व अहर्निश प्रक्रिया, म्हणजेच त्या व्यक्तीची सहजप्रवृत्ती होणे आवश्यक आहे. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया अमलात आणतांना दिवसभरात स्वतःकडून काया-वाचा-मने होणारी कर्मे अंतर्मुखतेला पूरक होण्यासाठी प्रयत्न केल्यास प्रक्रिया परिणामकारक होऊन अंतर्मुखता सातत्याने टिकवणे साध्य होईल.

Index and/or Sample Pages

In stock

स्वभावदोष निर्मूलनासाठी बौद्धिक आणि कृतीच्या स्तरांवरील प्रयत्न

70 63